मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते कोट्यवधीच्या विकास कामांचे लोकार्पण

उर्वरित कामांना निधी देण्याचे आश्वासन

अहेरी : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्लीमध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते शनिवारी (24 ऑगस्ट) कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

अहेरी उपविभागातील आलापल्ली हे शहर एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी आणि मुलचेरा या पाच तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील सर्वच प्रभागांमध्ये विविध विकास कामांसाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. जवळपास पाच कोटींच्या निधीतून सिमेंट रस्ते, नाल्यांचे बांधकाम, समाजभवन अशी विकास कामे करण्यात आली. आणखी काही कामे प्रगतीपथावर आहेत. विशेष म्हणजे विविध प्रभागात पायी फिरून ना.आत्राम यांनी या कामांचे लोकार्पण केले. यादरम्यान त्यांनी प्रभागातील नागरीकांशी संवाद देखील साधला. यावेळी अनेक वर्षांनी गल्लीतील रस्ते व नाली बांधकामासह विविध विकास कामे पूर्णत्वास आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांच्यासोबत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार यांच्यासह कैलास कोरेत, बालाजी गावडे, सांबय्या करपेत, ग्रा.पं.सदस्य पुष्पा अलोने, स्वप्नील श्रीरामवार, सोमेश्वर रामटेके, माजी ग्रा.पं. सदस्य पेद्दीवार, पराग पांढरे, मांतय्या आत्राम, बाबुराव तोर्रेम, रतन दुर्गे, विशेष भटपल्लीवार, आदित्य जक्कोजवार, महेश येर्रावार, शुभम चिंतावार तसेच विविध प्रभागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

उर्वरित विकास कामांसाठी निधी देणार

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आलापल्लीच्या विविध प्रभागात फिरून कामांचे लोकार्पण केले. प्रत्येक प्रभागात पायी फिरत असताना त्यांना काही ठिकाणी अजूनही कामे करण्याची गरज असल्याचे जाणवले. त्यासाठी निधीची गरज असल्याचे लक्षात आले. त्यांनी सरपंच व सदस्यांना तात्काळ या कामांची माहिती सादर करण्याचे सूचित केले. त्या कामांसाठी आणखी निधी मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.