आरमोरी : आरमोरी तालुक्यातील मौजा आकापूर येथील जंगल परिसरात आणि गावालगत रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. शेतातील धान पीक, मका व भाजीपाला इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

मा.आ. कृष्णा गजबे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी संजय बनपूरकर आणि इतर शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन संबधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची सूचना केली. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
या पाहणीदरम्यान भाजपचे जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, शेतकरी शामराव बनकर, उमेश बांडे, गोवर्धन भोयर, दामू पेंदाम, पोलीस पाटील विलास मेश्राम, रुमाजी भोयर, प्रभाकर नरुले, मोरेश्वर नरुले, वासुदेव नरुले, नितेश राऊत, भीमराव बारासगडे, संजय बांबोळे, गणेश ठाकरे, मुखरु हजारे, चंदू कोहपरे, पुरुषोत्तम कांबळे, देवाजी हजारे, वनरक्षक भोयर व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
रानटी हत्तींचा मुक्काम सध्या आरमोरी तालुक्यात वाढला आहे. या भागात सिंचनाची सोय बऱ्यापैकी असल्याने शेतात उन्हाळी धान, मक्याचे पीक आहे. पण ऐन पीक भरीस असताना रानटी हत्ती ते फस्त करत आणि पायदळी तुडवत नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जात आहे. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
वनविभागाने यावर स्थायी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. याशिवाय नुकसानभरपाईची रक्कम वाढवून देण्याचीही मागणी होत आहे.