एटापल्ली : तालुक्यातील हेडरी ते गट्टा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) एटापल्ली तालुक्याच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात बुधवारी आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, एटापल्ली तालुक्यातील हेडरी ते गट्टा हा 381 क्रमांकाचा मार्ग असून या रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत अवघड व कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवासी, नागरिक, गरोदर महिला, रुग्णांकरिता धोकादायक आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता बनविण्याची प्रक्रिया हाती घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) एटापल्ली तालुकाध्यक्ष संभा हिचामी, एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती जनार्धन नल्लावार, गट्टाचे उपसरपंच महक लेखामी, जांबियाचे सरपंच चेतन हिचामी, ग्रामपंचायत सदस्य राजु नरोटे, तालुका सचिव लक्ष्मण नरोटे, गेदा ग्राम पंचायत सदस्य अजय पदा, गेदाचे उपसरपंच दसरू मट्टामी, जेवेलीच्या सरपंच मुन्ना पुंगाटी, कृष्णार पाटील, सदाशिव हिचामी, सत्तू दोरपेटी, दुलासा हेडो, उमेश हिचामी, महारू लेकामी, मिरवा लेकामी, सुधाकर पदा, कटिया गोटा, दिनेश लेकामी, निकेश गोटा, सुरेश उईके, साईनाथ वड्डे आदी कार्यकर्ते होते.