गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीअंतर्गत सरळ सेवा व अनुकंपा तत्वावरील पदभरती ही शासन निर्णयानुसार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने व प्रामाणिकपणे राबवली जात आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
गट-क आणि गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा, पदोन्नती व बदली प्रक्रियेद्वारे भरण्यात येतात. त्याचप्रमाणे अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतीक्षा सुचित उमेदवारांना आवश्यक दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाते. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता, संवर्गातील उपलब्ध जागा व ज्येष्ठतेनुसार पारदर्शक समुपदेशनाद्वारे नियुक्त्या दिल्या जातात, असे सीईओ गाडे यांनी कळविले आहे.