गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पर्यावरणाची हाणी भरून काढण्यासाठी नवीन झाडे लावून लोहखनिज प्रकल्पाला टप्प्याटप्प्याने काम करण्याची परवानगी देण्याबाबतचा निर्णय लोकाभिमुख आहे, त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करताना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र ट्रायबल अॅन्ड बॅकवर्ड पिपल्स अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष डॅा.प्रमोद साळवे यांनी दिली.
सुरजागड प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याचे औद्योगिक मागासलेपण दूर होऊन समृद्धीची स्वप्ने पाहणाऱ्यांना वृक्षकत्तलीमुळे मात्र गडचिरोली जिल्ह्याला वाळवंटाचे स्वरूप ते की काय,अशी शंका येत होती. त्याकडे महाराष्ट्र ट्रायबल अॅन्ड बॅकवर्ड पिपल्स अॅक्शन कमिटीने शासनाचे लक्ष वेधले होते. तसे निवेदनही दिले होते. त्यावर मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत नवीन झाडे लावण्याचा निर्णय घेतला. नवीन प्रकल्पाला टप्प्याटप्प्याने काम करण्याची परवानगी देत अनियंत्रितपणे झाडांची कत्तल करण्याची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (अधिक बातमी खाली वाचा)

याशिवाय लॅायड्स मेटल्स कंपनीमधून 11 लाख वृक्ष लागवड करणार आहे. ही वृक्षलागवड निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वपूर्ण आहे. परंतू हे निर्णय अंमलात येण्यासाठी नागरिकांनी जागरूक असावे, अशी अपेक्षा डॅा.साळवे यांनी व्यक्त केली.