मासे पकडण्यासाठी गेला अन् इंद्रावतीच्या कुशीत विसावला

फिट येऊन पाण्यात पडल्याने मृत्यू

अहेरी : तालुक्यातील दामरंचा येथील शेतकरी लक्ष्मण पापय्या गावडे (42 वर्ष ) यांनी हे इंद्रावती नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असताना नदीच्या पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना फिट येण्याचा आजार होता.

गावडे कुटुंब गरीबीत जीवन जगत होते. आपल्या छोटेखानी शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. अशात लक्ष्मण गावडे इंद्रावती नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असताना तिथे फिट आल्याने ते नदीत कोसळले. फिट आलेल्या अवस्थेत त्यांना पोहणे शक्य न झाल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. (अधिक बातमी खाली वाचा)

घरातील कमावती प्रमुख व्यक्तीच गेल्याने गावडे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. दरम्यान जि.प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात गावडे परिवाराची भेट घेऊन सांत्वन करत आर्थिक मदत केली.