गडचिरोली : गडचिरोलीला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी बरेच काही करतो आहे आणि आणखी खूप काही करायचे आहे. हा आमच्यासाठी राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. गडचिरोलीला विकासातील अग्रणी जिल्हा बनवू, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 43 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. (अधिक बातमी खाली वाचा)
हा जिल्हा गेली अनेक दशके विकासापासून वंचित राहिला. पण 2014 पासून आम्ही त्याला विकासाच्या केंद्रस्थानी आणले. गडचिरोलीला माओवादापासून मुक्त करणे आणि तो उद्योग, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधायुक्त करणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले. (अधिक बातमी खाली वाचा)
आज अर्धा गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देश माओवादमुक्त करण्याचा जो निर्धार केला आहे, त् यादिशेने आम्ही काम करतो आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)
आमचे गडचिरोलीचे पोलीस, सी-60 जवानांसह यात मोठा वाटा उचलत आहेत. पोलीस दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमांनी पोलीस या विकास प्रक्रियेतील अग्रदूत बनले आहेत. गडचिरोलीला देशातील पोलाद सिटी बनविण्याच्या दिशेने आम्ही अतिशय गतीने पाऊले टाकली आहेत. सुमारे 1 लाख कोटींची गुंतवणूक ही गडचिरोली जिल्ह्यात येत आहे. (अधिक बातमी खाली वाचा)
हे करीत असताना गडचिरोलीचे जल, जमीन, जंगल आणि पर्यावरण राखण्यावर आमचा तितकाच भर आहे. मेडिकल कॉलेज असो, विमानतळ असो, रेल्वेमार्ग असो, रस्त्यांची कामे असो, शिक्षणाच्या सुविधा अशा सर्वच दिशांनी आज गडचिरोली जिल्हा भक्कम प्रगती करतो आहे. (अधिक बातमी खाली वाचा)
अर्थात यात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचीही तितकीच भक्कम साथ लाभते आहे आणि त्यांच्यामुळेच ही विकास प्रक्रिया गतिमान झाली आहे. (अधिक बातमी खाली वाचा)
सर्व जिल्हावासियांना गडचिरोली जिल्हा स्थापना दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.