मैत्री परिवार करणार जिल्ह्यातील १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

सोमवारी अभिनव लॅानमध्ये कार्यक्रम

गडचिरोली : मैत्री परिवार व मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टंसी लिमिटेडच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील 100 गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले जाणार आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत व्हावी यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. येत्या 6 मे रोजी अभिनव लॉन येथे हा कार्यक्रम होणार आहे. गडचिरोलीत एक बैठक घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले.

मैत्री परिवार गडचिरोली जिल्ह्यात विविध उपक्रम घेत असते. त्यात भव्य असा विवाह सोहळा, आदिवासी दुर्गम भागात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, आदिवासी विद्यार्थ्याचे पालकत्व स्वीकारणे, शिक्षण, वैद्यकीय सेवा अश्या अनेक सामाजिक कार्यात ही संस्था अग्रेसर असते. आता गरजु विद्यार्थांना शिक्षण घेताना दळणवळणाची सोय व्हावी म्हणून सायकलींच्या स्वरुपात मदतीचा हात पुढे केला आहे.

या कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हाधिकारी संजय दैना, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच अमरस्वरुप फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज बंड, मैत्री परिवाराचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष निरंजन वासेकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी आयोजित बैठकीला निरंजन वासेकर, दिलीप गडपल्लीवार, अविनाश चडगुलवार, डॉ.अमित साळवे, अनिल तिडके, संदीप बैस, अश्विनी भांडेकर, प्रा.राकेश चडगुलवार, भाऊ उप्पलवार, डॉ.शंकदरबार यांची उपस्थिती होती.