दूषित राजकारणाला शुद्ध करण्याकरिता गांधी विचारांची प्रासंगिकता- डॉ.किरसान

जिल्हा काँग्रेसकडून राष्ट्रपित्याला अभिवादन

गडचिरोली : वर्तमानात भारतीय राजकारण दूषित होत चालले आहे. लोकशाही राज्यात सुडबुधीचे राजकारण केल्या जात आहे. सरकारविरोधात बोलल्यास किंवा सत्याची बाजू घेतल्यास त्यांच्यावर खोटे आरोप लावून सत्ताधाऱ्यांकडून दडपशाही केल्या जात आहे. अशा दुषित राजकारणाला शुद्ध करण्याकरिता गांधींनी सांगितलेला सत्य आणि अहिंसेचा मार्ग, आणि विचारांची आज गरज आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, माजी जि.प.सदस्य कुसूम आलाम, दिलीप घोडाम, सुनील चडगुलवार, देवाजी सोनटक्के, हरबाजी मोरे, काशिनाथ भडके, संजय मेश्राम, शिवराम कुमरे, राकेश रत्नावार, राजेंद्र कुकडकर, भैय्याजी मुद्दमवार, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, रजनी आत्राम, कृष्णा वाढई, रोहित चंदावार, अनिल गुरनुले, माजिद सय्यद, प्रफुल आंबोरकर, जावेद खान, सोहेल खान, पुंजीराम वाघरे, अशोक बघेले, रवी क्षीरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.