जिल्हा काँग्रेस कमिटीने केला कृषी कार्यालयासमोर घंटानाद

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले लक्ष

गडचिरोली : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, बोगस बी-बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर कारवाई करावी, खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून लिकिंग करत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करावी अशा शेतकऱ्यांशी संबंधित अनेक मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.18) जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीस धावून यावे, पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि दुबार पेरणीसाठी आवश्यक ते सर्व शासकीय पाठबळ द्यावे, दुपार पेरणीकरीता उत्तम दर्जाचे बी-बियाणे द्यावे, बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अनेक कृषी केंद्रांवर युरिया व डीएपी खतांचा तुटवडा आहे. तसेच काही ठिकाणी खत विक्रेत्यांकडून ‘लिंकिंग’ पद्धतीने शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खतासोबत दुसऱ्या वस्तूंची खरेदी बंधनकारक केली जाते. हा प्रकार त्वरित थांबवावा यासह इतर मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक प्रीती हिरळकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, प्रभाकर वासेकर, रमेश चौधरी, विनोद लेनगुरे, घनश्याम वाढई, प्रतीक बारसिंगे, पुष्पलता कुमरे,  आशा मेश्राम, अपर्णा खेवले, सुनिता रायपुरे, शालिनी पेंदाम, कविता उराडे, मालता पुडो, पौर्णिमा भडके, उत्तम ठाकरे, सुभाष कोठारे, सुरेश भांडेकर, योगेंद्र झंजाळ, उमेश आखाडे, जितेंद्र मुनघाटे, मिलिंद बारसागडे, जावेद खान, माजिद सय्यद, निखिल खोब्रागडे, श्रीनिवास ताटपल्लीवार, स्वप्निल बेहरे, सुधीर बांबोळे, गोपाल कविराज, चोकाजी बांबोळे, नृपेश नांदणकर, रमेश धकाते, प्रफुल अंबोरकर, जितेंद्र मुप्पीडवार, तोमदेव जुवारे, सुभाष कोठारे, नीलकंठ गेडाम, गोपाल कोमलवार, जोगुजी तुंकलवार, नामदेव वासेकर, लहुजी भांडेकर, नामदेव फावणवाडे, रवींद्र मडावी, रोहिदास अलाम, तुळशीराम बोबाटे, जोगुजी भोयर, रमेश मुनरतीवार, देवराव मोहुर्ले, राजेंद्र कुकडकार, सुभाष धाईत, नामदेव अंडगलवार, जनार्धन तुंकलवार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, आणि शेतकरी उपस्थित होते.