6 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी, आंदोलन-सभांवर नियंत्रण

परवानगीशिवाय आयोजन नाही

गडचिरोली : जिल्ह्यात 23 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून 6 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

अनेक राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलन, सभा, मिरवणूक किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाण्याची शक्यता लक्षात घेता हा आदेश लागू करण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)

जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37(1) व (3) नुसार हा आदेश लागू केला आहे. यात (अधिक बातमी खाली वाचा)

शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, लाठ्या, बंदुका किंवा शरीरावर इजा करण्यासाठी वापरता येतील असे इतर कोणतेही उपकरण आणि दाहक व स्फोटक पदार्थ बरोबर ठेवण्याबाबत पूर्ण मनाई राहणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती, त्यांच्या प्रतिमा किंवा त्यांच्या दर्शविण्याने समाजात असंतुलन निर्माण करणारे प्रदर्शन, अशोभनीय घोषणाबाजीस मनाई राहणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

जमावबंदीच्या अटींमध्ये सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव, मिरवणुका, मोर्चे किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील. (अधिक बातमी खाली वाचा)

नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.