40 वर्षानंतर एकमेकांना भेटले वसंत विद्यालयाचे विद्यार्थी

शालेय आठवणींना दिला उजाळा

गडचिरोली : येथील वसंत विद्यालयात इयत्ता दहावीत (सत्र 1984-85) शिकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रथमच स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल 40 वर्षानंतर सर्वजण एकत्र आल्याने तत्कालीन आठवणींना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडितराव पुडके यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुचिता कामडी होत्या. याप्रसंगी मुख्याध्यापक पी.के. घोडमारे, जेष्ठ शिक्षक एस.आर.काळे, डी.डी.सोनटक्के, सेवानिवृत् मुख्याध्यापक गजानन मेश्राम, निवृत्त पर्यवेक्षक व्ही.एम.फरकाडे, शिक्षक गडसुरलावर, शिक्षिका शकुंतला पाठक, धनश्री तुकदेव, जयश्री तुकदेव, आशा करोडकर, शिक्षिका वऱ्हाडे, कन्नाके, मोतीराम गोन्नाडे, मुख्य लिपिक उदय धकाते, शिपाई राकेश हेडाऊ आदी उपस्थित होते. (अधिक बातमी खाली वाचा)

या स्नेहमिलनात वर्गमित्रांना पुन्हा एकत्र आणणारे आणि संपूर्ण आयोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे देवाजी लाटकर आणि शाळेचे मुख्य लिपिक उदय धकाते यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका यांची विशेष उपस्थिती होती. सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, त्या काळातील शालेय जीवनाचे क्षण पुन्हा अनुभवले. या कार्यक्रमाकरिता मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातून माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

प्रास्ताविक धनंजय चाफले यांनी, तर संचालन सुनीता चुधरी-भोयर आणि उल्हास आखाडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत विद्यालयाचे त्या बॅचचे माजी विद्यार्थी देवाजी लाटकर, उल्हास आखाडे, सुनील खोब्रागडे, मनोज आखाडे, धनंजय चाफले, दिलीप काळबांधे, अनिता बांबोळे, सुनिता चुधरी, अनिता वाघमोडे, वनिता हटवार, अनिता साळवे, दिलीप काळबांदे, देवाजी लाटकर, मनोज आखाडे, सुनील खोबरागडे, उल्हास आखाडे, रवींद्र मूलकलवार, दीपक मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.