Home दैनंदिन बातम्या विद्यार्थ्यांनी केले ‘जिल्ह्याची दशा आणि दिशा’ विषयावर विचारमंथन

विद्यार्थ्यांनी केले ‘जिल्ह्याची दशा आणि दिशा’ विषयावर विचारमंथन

वर्धापन दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करताना नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, सोबत डॅा.प्रणय खुणे, सभापती अनिल कुनघाडकर, सीमा कन्नमवार, रमेश भुरसे व इतर.
विजेत्या स्पर्धकांसह नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, सोबत इतर पदाधिकारी.
भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करताना बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, न.प.उपाध्यक्ष निखिल चरडे आदी.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या 44 वर्षाच्या वाटचालीत जिल्ह्याची पूर्वीची दशा आणि आताची दिशा यावर प्रथमच विद्यार्थीवर्गाने विचार मांडत मंथन केले. जिल्ह्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित वक्तृत्व स्पर्धेत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या इतर ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या अभ्यासपूर्ण विचारांना प्रभावीपणे मांडले. (खाली वाचा)

याशिवाय यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपले विचार आणि सूचना मांडल्या. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाची सद्यस्थिती, आव्हाने आणि भविष्यातील विकासाची दिशा यावर सर्वांनी आपली मते मांडली. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी रोड, गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात या स्पर्धेचे आयोजन केले होते. (खाली वाचा)

‘गडचिरोली जिल्ह्याची दशा आणि दिशा’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे, नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे आणि इतर पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. (खाली वाचा)

किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांनी प्रास्ताविक तर डॉ.भारत खटी यांनी स्पर्धेचे संचालन केले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून पत्रकार मनोज ताजने यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांतील नागरिकही उपस्थित होते. (खाली वाचा)

वक्तृत्व स्पर्धेतील उत्कृष्ट वक्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवली होती. याशिवाय सहभागी स्पर्धकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्या वतीने सर्व स्पर्धकांना नोटबुक आणि पेन देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. (खाली वाचा)

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक ओमकांत कृष्णा राऊत, द्वितीय पारितोषिक मानसी कुनघाडकर, तृतीय पारितोषिक निशांत सतीश विधाते, तर चतुर्थ पारितोषिक हिमांशू निलेश मडावी यांनी पटकावले. तसेच सुधा उद्धव बांगरे, रमेश अधिकारी व दिवाकर गेडाम यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. (खाली वाचा)

बक्षीस वितरण समारंभास प्रामुख्याने नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोरकर, शहराध्यक्ष तथा न.प.चे बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, सभापती तथा महिला शहराध्यक्ष सीमा कन्नमवार, सभापती हर्षल गेडाम, नगरसेवक अंकुश नैताम, जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके, शिल्पा गव्हारे, अर्चना निंबोंड, सुधाकर पेटकर, विलास पा.भांडेकर, प्रिती खोब्रागडे, भूपेश कुळमेथे, घनश्याम वाढई, बंडू झाडे, कान्होजी लोहबरे, रमेश नैताम, दतु माकोडे, जनार्दन साखरे, अरुण उराडे, किशोर गटकोजवार, फुलचंद वाघाडे, देवाजी लाटकर, विनोद धर्मपुरीवार तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (खाली वाचा)

गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या वक्तृत्व स्पर्धा व चर्चासत्रामुळे युवा पिढीला जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांवर विचार करण्याची आणि आपले मत मांडण्याची संधी मिळाली.