‘गाव चलो अभियान’ म्हणजे सर्वव्यापी, संपूर्ण समाजाला जोडण्याचा उपक्रम

भाजपच्या कार्यशाळेत खा.नेते यांचे प्रतिपादन

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवार, दि.२८ ला गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन गडचिरोलीतील महाराजा लॉनवर करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने आमदार डॉ.रामदास आंबडकर, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सा. पोरेड़्डीवार, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, योगिता पिपरे, सदानंद कुथे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, जेष्ठ नेते गजानन येनगंदलवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, व्हीजेएन मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मदने, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गोवर्धन चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खा.नेते म्हणाले, गाव चलो अभियान हे सर्वव्यापी, सर्वसमावेशक, संपूर्ण समाजाला जोडण्याचे आणि एकत्र आणण्याचे अभियान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ देशात उत्स्फूर्त वातावरण असून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश सकारात्मक उर्जेने भरलेला आहे. विकासित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून कल्याणकारी योजना जमिनीवर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मोदी सरकारवरील जनतेचा विश्वास सतत वाढत आहे. गाव चलो मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये जाऊया आणि त्यांना सशक्त भारत, स्वावलंबी भारत आणि विकसित भारत बनवण्याचा संकल्प करूया, असे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, संचालन जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी, तर आभार प्रदर्शन जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी केले.