लाचखोरीप्रकरणी अखेर विक्रमपूरच्या सरपंचाला गमवावे लागले सरपंचपदासह सदस्यत्व

विभागीय अपर आयुक्तांचा निर्णय

चामोर्शी : तालुक्यातील विक्रमपूर (जयनगर) येथील सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार यांना घरकुलासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात अखेर सरपंचपदासह सदस्यत्वही गमवावे लागले. कर्तव्य पार पाडण्यात हेळसांड केल्याचा ठपका ठेवत अपर आयुक्त डॅा.माधवी खोडे यांनी त्यांना अपात्र घोषित केले.

सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांच्यावर घरकुलाच्या लाभार्थ्याकडून १० हजारांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली गु्न्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना सरपंचपदावरून पायउतार होण्याचा आदेश प्रशासनाने दिला. पण त्या निर्णयाविरूद्ध ओल्लालवार यांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल करून स्टे मिळविला होता. यादरम्यान जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार अपर आयुक्तांनी ओल्लालवार यांना सरपंच आणि सदस्यपदावर राहण्यास अपात्र ठरविले.