जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे देसाईगंजमध्ये जल्लोषात स्वागत

भाजपकडून आतिषबाजीसह आभार

देसाईगंज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे रविवारी देसाईगंज येथे आतिषबाजीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मोदी सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सामाजिक न्यायाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असून संविधानाने दिलेला समान संधीचा अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी ही जनगणना आधारस्तंभ ठरेल. यामुळे राजकीय व सामाजिक प्रतिनिधित्वाच्या मागण्यांना आधार मिळेल, अशी प्रतिक्रिया यावेळी मा.आ.कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, राजेश जेठानी, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, जिल्हा सचिव सचिन वानखेडे, माजी बालकल्याण सभापती रोशनी पारधी, तालुका महामंत्री योगेश नागतोडे, महामंत्री मोहन पाटील गायकवाड, वसंत दोनाडकर, गोपाल उईके, अश्विनी कांबळे, सदानंद ठाकरे, जोतू तेलतुंबडे, केवळराम झोडे, कुलदीप आमले, हिरालाल शेंडे, कैलास पारधी, कपिल बोरकर, चंद्रकांत रणदिवे, शंकर पारधी, चक्रधर नाकाडे, सरपंच धनंजय तिरपुडे, सरपंच केवळराम टिकले, अजय राऊत, रवी प्रधान, पवन मेश्राम, श्रीकांत नागिलवार, सुशील पोरेड्डीवार, विद्यासागर वालोदे, भास्कर बनसोड, हेमा कावळे, श्यामराव अलोणे, प्रमोद झिलपे, अरुण राऊत, आदित्य मिसार, अंचित मिसार, विलास पारधी, रोशन ठाकरे, संदीप राऊत, सागर नाकाडे, बादल रहाटे, खुशाल देखणे, हेमंत गजघाटे, गुलाब मस्के यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.