गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त भारतीय जनता पक्ष जिल्हा गडचिरोलीतर्फे ‘संकल्प ते सिद्धी’ या विशेष जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी गडचिरोलीत पत्रकार भवनात करण्यात आले होते. (सविस्तर बातमी खाली वाचा)
कार्यशाळेची सुरुवात जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त दीप प्रज्वलन करून अभिवादनाने झाली. अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते होते. सोबत प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, कि.मो.प्र.सचिव रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दत्ता सुत्रपवार, कामगार आघाडीचे प्र.सचिव गोवर्धन चव्हाण, ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार, विलास पा.भांडेकर, मुक्तेश्वर काटवे, अनिल करपे, विनोद देवोजवार यांच्यासह या कार्यशाळेला जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, मंडळ संयोजक, तालुकास्तरावरील कार्यकर्ते, महिला व युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा, सुशासन व गरिब कल्याण या त्रिसुत्रीच्या माध्यमातून भारताला नव्या उंचीवर नेले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मूलमंत्रातून संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण झाले आहे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य या सरकारने केले असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने 60-65 वर्षं देशावर राज्य केले, मात्र जे काम तेवढ्या काळात होऊ शकले नाही, ते केवळ 11 वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाले. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवणे, तीन तलाकचा निर्णय, सर्जिकल स्ट्राइक, ‘ऑपरेशन सिंदूर’, राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय, देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अग्रगण्य बनवली आहे. देशाची प्रतिमा बळकट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचे डॅा.नेते म्हणाले.
या कार्यशाळेद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजना, कार्यपद्धती, तसेच आगामी काळात राबवायच्या जनजागृतीपर उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचा उपयोग भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी होणार होईल, असे मा.खा.डॉ.नेते म्हणाले.
“संकल्प ते सिद्धी” ही कार्यशाळा केवळ एक आयोजन नव्हे, तर पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मंचावरील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.