जिल्ह्याची खरीप हंगामातील नजरअंदाज पैसेवारी 0.72

1504 गावे खरीप पिकाखाली

गडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामात काही भागात पावसाने पिकांचे नुकसान केले असले तरीही 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेले एकही गाव नाही. प्रशासनाने जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्ह्याची पैसेवारी 0.72 एवढी आकारण्यात आली. तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने ही संकलित पैसेवारी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण 1689 गावे आहेत. त्यापैकी 1558 गावे खरीप पिकाखाली आहेत. याशिवाय रब्बी पिकासाठी पात्र आणि खरीप पिकाच्या दोन-तृतीयांश क्षेत्राखालील 4 गावे या वर्गात गणल्या गेली आहेत. खरीप पिकाखाली असलेल्या गावांपैकी 58 गावांत यावर्षी पिके झालेली नाहीत.

खरीप पिकाखालील 1504 गावांमध्ये पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त असल्याचे नोंदले गेले असून 50 पैशांखाली पैसेवारी असलेले कोणतेही गाव नाही. ही पैसेवारी नजरअंदाज असून अंतिम पैसेवारी जानेवारी महिन्यात जाहीर होईल.