व्याघ्रबळी ठरलेल्या मातेच्या पाल्यांना मिळाले जगण्याचे बळ!

शिवसेना नेते अरविंद कात्रटवार यांनी घेतली दोन भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी

अमिर्झा टोली येथील दोन भावंडांना गावकऱ्यांसमक्ष मदत देताना अरविंद कात्रटवार

गडचिरोली : निराधार, गरजवंताला आधार देऊन त्यांचे दायित्व स्विकारणे आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा देऊन जगण्याचे बळ देणे यासारखे पुण्यकार्य दुसरे कोणतेही नाही. संकटाच्या वेळी गरजवंतांच्या मदतीला धावून जाणे, हाच खरा मानवधर्म आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गडचिरोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी मानवधर्माच्या शिकवणीचा प्रत्यय आणून देत, स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा मानवधर्म निभावला. गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा टोली येथील व्याघ्रबळी ठरलेल्या महिलेच्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

अमिर्झा टोली येथील अल्पभूधारक महिला शेतकरी मंदा संतोष खाटे या आपल्या शेतशिवारात कामासाठी गेल्या असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यांच्या पश्चात पती संतोष खाटे आणि आदीनाथ व दुर्गेश नावाची छोटी मुले आहेत. खाटे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. दुर्गेश व आदिनाथने चांगले शिक्षण घेऊन यशोशिखर गाठावे अशी आई मंदा खाटे यांची ईच्छा होती. त्यांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. परंतू व्याघ्रबळीच्या रूपात काळाने त्यांना हिरावून नेल्यानंतर या मुलांच्या शिक्षणात अडथळा तर येणार नाही ना, अशी स्थिती निर्माण झाली. खाटे कुटुंबाची व्यथा कळताच अरविंद कात्रटवार यांनी या कुटुंबाची भेट घेऊन मातृछायेपासून पोरके झालेल्या त्या भावंडांना आधार देण्याचे ठरविले. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन्ही भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारून कात्रटवार यांनी मानवतेचे दर्शन घडविले. एवढेच नाही तर या कुटुंबाला जीवनावश्यक साहित्य दिले.

याप्रसंगी उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, संजय बोबाटे, विभाग प्रमुख अमित बानबले, उपविभाग प्रमुख संदीप आलबनकर, विभाग प्रमुख प्रशांत ठाकुर, रमाकांत चिंचोळकर, सचिन मडावी, जगन चापले, सुरज उईके, अंबादास मुनघाटे, दिलीप वालदे, अनिल कोसमशिले, रत्नाकर रंधये, त्र्यंबक फुलझेले, गणेश गेडाम, राहुल सोरते, प्रविण निसार, छगन चापडे, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, रविंद्र चुधरी, अनिल दोडके, प्रकाश नागापूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम, मंगेश कामडी, सुधाकर सावसागडे आदी शिवसैनिक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.