– म्हणून ‘त्या’ जहाल महिला नक्षलीने केले गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

ऐका पोलिस अधीक्षक काय सांगतात

गडचिरोली : छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांनी मिळून जिच्यावर ११ लाखांचे ईनाम ठेवले होते त्या रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी या २८ वर्षीय महिला नक्षलीने शनिवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शांततेचे प्रतिक असलेला पांढरा दुपट्टा आणि बुके देऊन तिचे स्वागत केले. एवढ्या जहाल महिला नक्षलीचा चळवळीत राहून काय भ्रमनिरास झाला, महिलांना कोणता त्रास सहन करावा लागतो हेसुद्धा तिने आत्मसमर्पण करताना पोलिसांना सांगितले. पोलिस अधीक्षकांनी तिच्या आत्मसमर्पणामागिल कारणे सांगताना पत्रकारांना ही बाब सांगितली.

रजनी ही छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. २००९ मध्ये नक्षल चळवळीत दाखल झालेल्या रजनीचा अनेक हिंसक नक्षली कारवायांमध्ये सहभाग होता. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने ६ लाख तर छत्तीसगड शासनाने ५ लाख रुपयांचे ईनाम ठेवले होते. तिला आत्मसमर्पण योजनेतील सर्व लाभ दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय उर्वरित नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण करावे, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पोलिस दलाकडून सहकार्य केले जाईल, असे आवाहन यावेळी नीलोत्पल यांनी केले.